Wednesday 30 September 2015

कट्यार नाटकात एक कविराज नावाच पात्र आहे.... संगीतातलं ज्ञान खूप आहे पण गाता येत नाही ... तर सदाशिव आणी कविराज ह्यांचा एक संवाद कविराज : मी देखील आता गाणं शिकणार... सदाशिव : काय कविराज तुम्ही आता गायन विद्या शिकणार ? कविराज : गायन विद्या नाही रे... गायन कला.. सदाशिव : अहो तेच ते कविराज : तेच ते नाही.... विद्या वेगळी... कला वेगळी.. सदा : कशी ? कवि : विद्या ही बाहेरून आत शिरते... तर कला ही आतून बाहेर पडते.... विद्या ही जगाचं कोडं सोडवते.. तर कला जगाचं कोडं घडवते... विद्येसाठी केवळ मस्तक पुरे... तर कलेसाठी मस्तक आणि ह्रदय दोंही हवीत... विद्या सुपारीसारखी देता येते कोणालाही... तर कला उचलावी लागते तपकिरिसारखी... विद्या ही तालासारखी आहे.. ती शिकता येते आणि शिकवता येते... तर कला ही लयीसारखी आहे... ती मुळात असायला लागते आणि जन्माला येताना वरूनच घेउन यायला लागते..

Tuesday 30 June 2015

🔹 There was a romantic poet : अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं 🔸 There was a philosophical poet : मै पल दो पल का शायर हूँ 🔹 There was a regretful poet: कभी कभी मेरे दिल में खयाल आता है 🔸 There was a poet who was a committed lover: मेरे दिल में आज क्या है तू कहें तों मैं बता दूँ 🔹 There was a poet content with his life: मांग के साथ तुम्हारा 🔸 There was a poet who compromised his love for his lover : चलो इक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों 🔹 There was a downcast poet : जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला 🔸 There was a carefree poet : मैं जिंदगी का साथ निभाता चला 🔹 There was a non-materialistic poet : ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है 🔸 There was a patriotic poet : ये देश है वीर जवानों का 🔹 There was revolutionary poet : जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहाँ है 🔸 There was pessimistic poet : तंग आ चुके है कशमकश-ए-जिंदगी से हम 🔹 There was a peace-loving humanitarian poet : अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम 🔸 There was a secular poet : तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा 🔹 There was a flirting poet : ए मेरी जोहराजबी तुझे मालूम नहीं 🔸 There was a reminiscing poet : जिंदगी भर ना भूलेगी ये बरसात की रात All these Poets had ÖNE name : || Saahir Ludhianvi || Let's Salute one of the most Versatile~n~Legendary Hindi~n~Urdu Poet on his 94th Birthday ON 26 jun 15 ...

Tuesday 16 June 2015

पु. ल. म्हणतात -

जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी असते.

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.

खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.

सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.

ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.

अत्तराची बाटली संपतानाच जपायची असते!


😊😊😊